नागरी समस्यांसाठी केडीएमसी मुख्यालयावर आरपीआयचा मोर्चा
कल्याण (वार्ताहर) - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत धडक देण्यात आली. आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, जिल्हा सचिव रमेश बर्वे, डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगरे, युवा जिल्हा अध्यक्ष जय जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने आरपीआय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
मुस्लिम बांधवांकरिता दफनभूमी करिता पालिका प्रशासनाकडून जागा मिळाली पाहिजे. सर्व झोपडपट्टी धारकांना इमारतीमध्ये घरे मिळालीच पाहिजे. त्यासाठी बीएसयुपी योजना लागू करावी. झोपडपट्टी धारकांना शासना कडून आलेला निधी झोपडपट्टी वासियांसाठी वापरण्यात यावा व इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी दिली.
