Breaking News

संविधान मूल्यांचा दैनंदिन जीवनात अवलंब करण्याचे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांचे आवाहन

संविधान मूल्यांचा दैनंदिन जीवनात अवलंब करण्याचे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांचे आवाहन

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संविधान मूल्यांची जनजागृती शहरातील नागरिकविद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या पूर्ण वर्षभरात ‘हर घर संविधान’सामूहिक प्रास्ताविक वाचननिबंधवक्तृत्वरंगोळी स्पर्धाव्याख्यानमाला आणि चर्चासत्रे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्य कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल  यांनी मार्गदर्शन करताना संविधान हे जिवंत दस्तऐवज असून बदलत्या परिस्थितीत समाजाला दिशा देणारे असे सांगितले. नागरिकांनी मूलभूत अधिकारांबरोबरच मूलभूत कर्तव्यांचे पालन करून समानतान्याय आणि लोकशाही मूल्यांचे दैनंदिन जीवनात पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषत: मुलांपर्यंत संविधानाचे ज्ञान पोहोचल्यास राष्ट्र अधिक सक्षम व सजग नागरिक घडवेलअसेही ते म्हणाले. तसेच आंबेडकर उद्यान परिसरात ग्रंथालयऑडिटोरियम आणि स्मृतीस्थळ यांचा समावेश असलेली एकात्मिक सुविधा उभारून आंबेडकरी विचारांची परंपरा पुढील पिढीपर्यंत दृढ करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात संविधान अभ्यासक व विश्लेषक प्राध्यापक नूरखा पठाण यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्येलोकशाही व्यवस्थासामाजिक समरसता आणि बदलत्या सामाजिक संदर्भातील संविधानाचे महत्त्व या विषयांवर प्रभावी विचार मांडले. विचारमंचावर कार्यक्रम अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसेअतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाडउपायुक्त संजय जाधवप्रसाद बोरकररामदास कोकरेमहापालिका सचिव किशोर शेळकेप्रमुख पाहुणे सिद्धोधन आहेर (सहसचिवपर्यावरण विभाग मंत्रालय)माजी महापौर रमेश जाधवज्येष्ठ समाजसेवक अण्णा रोकडेरतन बनसोडेसंयोजक चंद्रकांत पोळविजय सरकटे आणि संतोष हेरोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी केले.

दुपारी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन केडीएमसी मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण “We The People – संगीतमय महानाट्य” हे होते. भारतीय संविधानाची गौरवगाथाआंबेडकरी विचारसरणीसामाजिक न्यायलोकशाही तत्त्वज्ञान आणि बहुजन इतिहासाची उत्कृष्ट मांडणी करणारी ही संगीत नाट्यकृती शाहीर सीमा पाटील आणि संगीतकार जॉली मोरे यांनी अत्यंत प्रभावी आणि भावपूर्ण पद्धतीने सादर केली. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रमाच्या प्रोबाधन सत्राचे सूत्रसंचालन समाधान मोरे यांनी केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कल्याण डोंबिवली महानगरपालिकाक.डों.म.प. बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. नागरिकविद्यार्थीकर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांतून भारतीय संविधानाचा आत्मालोकशाही मूल्ये आणि सामाजिक समरसतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...