पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
महापालिका आयुक्त अभिनव गोयल
कल्याण! पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी तसेच कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज कल्याण मधील उंबर्डे अमृत प्रकल्प येथे वृक्षारोपण करताना त्यांनी हे प्रतिपादन केले. याचवेळी त्यांनी उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प येथे मीयावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्याचा शुभारंभ केला ,महापालिका परीक्षेत्रात अन्य सहा ठिकाणी देखील अशी मियावाकी जंगले तयार केली जातील अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.
आज देशी प्रजातीच्या सुमारे 3000 झाडांची लागवड केली आहे, यापुढे लोकसहभागातून वृक्षारोपण केले जाईल ,त्याचप्रमाणे "एक विद्यार्थी एक झाड "ही संकल्पना- ही ऍक्टिव्हिटी दर महिन्यात राबविण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक मुक्त शहर हे अभियानही आपल्याला राबवायचे आहे असेही आवाहन आयुक्त यांनी यावेळी केले.
या वृक्षारोपण अभियानात आमदार सुलभा गायकवाड तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, एम एम आर डी ए चे अधीक्षक अभियंता, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, डॉ. प्रशांत पाटील उद्यान अधीक्षक अनिल तामोरे तसेच इतर अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
